Wednesday 23 November 2011

tu mhantes te thik aahe pan ......

सुनिता तू म्हणतेस ते ठीक
आहे पण ...........................
सुनिता , ठाकरे मंडळी ( बाळा साहेब , उद्धव , राज , लिंबू टिंबू - आदित्य  इत्यादी वेगेरे )  
आणि त्यांच्या राजकीय भूमिका / ध्येय / धोरणे या त्यांच्या पक्षाच्या ( शिवसेना / म न से ) अंतर्गत मामला आहे . पण ठीक आहे या निमित्ताने तू थोडीशी ताळ्यावर येऊन
जमिनीवर उभी राहून आणि आजच्या काळाशी संबधित व सुसंगत लिहायला लागलीस .
हे हि नसे थोडके. सुनिता , महाराष्ट्रातल्या मराठा बहुजनच काय कोणत्याच तरुणांनी ठाकरे आणि कंपनीच्या कोणत्याच तंबूत ( कंपूत ) जाऊ नये या मताचा मी आहे . फक्त ठाकरेच
कशाला शरदरावांचा राष्ट्रवादी , सोनिया बाईंचा कोन्ग्रेस , आठवले आणि इतर दलित संघटनाचे छोटे मोठे तुकडे , बसपा / भा जा पा सारखे उपरे .....इतकेच काय अगदी मदाऱ्याचे
अस्वल ( अण्णा हजारे ) या पेकी कुणाच्याही नादाला मराठा व बहुजनांच्या नव तरुण पिढीने लागू नये .
आणि गेरसमज करून घेऊ नकोस ( छावा/ संभाजी ब्रिगेड / जिजाऊ ब्रिगेड / शिवधर्मवाले / मराठा महासंघ यांच्या तर सावलीलाही उभे राहू नये )
मला सांग सुनिता या पेकी कोण धुतला तांदूळ आहे ? शिवसेनेच्या नावाने बोटे मोडून काय उपयोग ? त्यांना एवढे सगळे करून जेमतेम ५ वर्ष सत्ता मिळाली . उरलेली ४८ वर्षे या महाराष्ट्रात
बहुजनांचीच सत्ता होती ना ! तीन वर्ष मनोहर जोशी ( ब्राम्हण )  आणि २ वर्ष ७ महिने अंतुले ( मुस्लीम ) सोडले तर बाकी ४८ वर्ष मंत्रालयातल्या ६ मजल्या वरील मुख्यामंत्र्याच्या खुर्चीत
टेकलेली बुडे बहुधा मराठ्यांची आणि अपवादाने उर्वरित बहुजनांचीच होती आणि आहेत .
मंत्री मंडळातही कायम पाटील -देशमुखांचाच बोलबाला राहिलेला आहे . म्हणजेच ठाकरेंनी कितीही
पटकली आणि भा ज पा ने त्यात कितीही हवा भरली तरी महाराष्ट्रातील मराठा - बहुजन समाज
त्यांना फारशी भिक घालत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालंय. ते इंदूर हून आले कि आणखी कुठून याचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याभिषाकाच्या वेळी त्यांचा मूळ कुळपुरुष " शिसोदिया " होता आणि तो क्षत्रिय राजपूत होता असा वंशावळीचा पुरावा काढला होता . मग
शिवाजी राजांना सुद्धा तू परप्रांतीय म्हणणार का ग सुनिता ?
 बेताल लिहून आमच्या कडून स्त्रीदक्षिण्या ची अपेक्षा करताना हे लक्षात ठेव सुनिता कि तू स्त्री नाहीस ; बृहनडे चे रूप घेतलेला कुणी तरी बाप्याच आहेस हे आम्ही केव्हाच ओळखले आहे .
पण असो हा काही आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा नाही .
महाराष्ट्रातल्या मराठा बहुजन तरुणांनी शिवसेना / म न से / भा ज पा च्या नादी लागू नये हा तुझा मुद्दा १०० टक्के मान्य पण याच बरोबर या तरुणांनी आपल्या शिक्षणाकडे व करिअर कडे लक्ष द्यावे
कोणत्याच राजकीय पक्ष संघटनांच्या नादी लागू नये असे सांगितले असतेस तर ते अधिक निरपेक्ष
सत्य वाटले असते . याचा अर्थ असाही नाही कि सगळ्यांनीच तिकडे पाठ फिरवावी . ज्यांचात क्षमता आहे त्यांनी खुशाल राजकारण करावे . पण कायम सतरंज्या उचलाव्या लागत असतील / दगड गोटे हातात दिले जात असतील / आणि त्या बद्दल श्रमपरिहार म्हणून दारू पाजवली जात असेल तर
या स्थितितील तरुणांनी त्वरित त्या पासून दूर व्हावे हे उत्तम .
आणि तू घाबरू नकोस सुनिता ठाकरे इतके हि अक्कल बाज नाहीत कि महाराष्ट्राला बुद्धू बनाऊ शकतील तुझ्या माहिती साठी सांगतो १९९५ ला शिवसेना भा ज पा ची जी सत्ता आली ती आमच्या
मराठा भूषण, क्रिकेट वाचस्पती, कृषीवल हृदय सम्राट , बारामती पुत्र  माननीय नामदार शरदचंद्रजी  गोविंद रावजी पवार यांच्याच महाकृपेने ! आणि आताही हाच मराठा गडी   पुन्हा त्यांच्या गोटात शिरून अंडी घालण्याच्या तयारीत आहे . तेव्हा सावधान धोका पुढूनच आहे असे नाही. तो आतून बाहेरून भोवताली
असा चोहीकडून आहे . मराठा बहुजनाच्या लेकरांना सावध करायची खरेच मनापासून तळमळ असेल तर
कुणा बद्दल वयक्तिक व जाती आधारित आकस न ठेवता त्यांना योग्य काय अयोग्य काय ते सांग .
सुनिता तू एखाद्या गोष्टीचा आभ्यास चांगला करतेस , वाद - प्रतिवाद हि प्रभावीपणे करू शकतेस
या तुझ्या कोशल्याचा विधायक दिशेने विकास व्हावा आणि त्याचा मराठा बहुजनाच्या तरुण पिढीला
फायदा व्हावा हि अपेक्षा . पुन्हा एकदा पुराण इतिहास सोडून वर्तमानात आल्या बद्दल अभिनंदन


No comments:

Post a Comment