Tuesday 15 November 2011

anita ( ? ) patil yansi

प्रिय  अनिता

मला तुझ्या लेखन आणि प्रबोधना बद्दल आजीबात आक्षेप नाही
मला तू ओळखतेस / ओळखतोस ही आणखी चांगली गोष्ट झाली.
तू तुझी ओळख लपवून का लिहितेस / लिहितोस ?
ज्यांना खरोखर समाज प्रबोधन करायचे असते त्यांनी समाजाचा रोष सहन करण्याची देखील मानसिक /शारीरिक तयारी ठेवावी लागते . तुकारामाला आदर्श मानताना फक्त त्यांचा परखडपणाच नाही तर खुले पणाही आपण आदर्श म्हणून स्वीकारला पाहिजे. तुकारामांनी
अनंत संकटे ( अगदी मृत्यू देखील ) स्वीकारून आपले समाज प्रबोधनाचे कार्य केले . पण कधीही ओळख लपविली नाही .
आपण लिहित चांगले आहात . त्यात आभ्यास आणि चिंतन ही आहे . पण आपण जे लिहितोय ते या सायबर युगात समाजाला पुढे नेणारे / काही दिशा देणारे आहे की
जुन्या जखमांना चिघळून दुहीची बीजे पेरणारे आहे ? हे तुम्हीच पहा .
इतिहासाचा आभिमान जरूर असावा . त्यातून प्रेरणा ही घ्यावी . पण समाजात तेढ निर्माण होईल असे संदर्भ उकरून काढणे हे विचारवंतांचे / समाज प्रबोधकांचे काम नव्हे .
हं......जर आपण छावा / संभाजी ब्रिगेड / जिजाऊ ब्रिगेड / शिवधर्म या सारख्या संघटनाशी
संबधित असाल तर आपले हे वेचारिक अभियान आपणास लखलाभ . मग आपणास काही  सांगण्यास काही अर्थ नाही .
                                                                                 धन्यवाद ! 

                                                                          आपला
                                                                          रवींद्र तहकिक

No comments:

Post a Comment