Wednesday 26 October 2011

nar 36 nakhare vali

अनिता बाई बद्दल काय बोलावे ?

ही नार  धारदार 
करी तलवारीचे वार
ब्राम्हणांचे फेडी पार 
धोतर SSSSSSSSSS 

देई शेंडीला झटका 
 देई ढेरीला फटका 
जानव्याला देई खोल 
चटका SSSSSSSSSSS 

घेई मराठ्यांचा केवार
बसे ब्राम्हणांच्या उरावर 
काहीकेल्या तिथूनिया
उठेना SSSSSSSSSSS

 

Thursday 20 October 2011

ya patilinbaila aavra

या पाटलीणबाईला आवरा

अरे कुणी तरी या बोलभांड अनिता पाटलीण बाईला आवरा,...............
इतिहासातून नकोते संदर्भ उचलून त्यातून हवेतसे अर्थ काढून ही कजाग बाई काय सिद्ध आणि त्यातून काय साध्य करू इच्छितेय हेच मला कळत नाही . साने गुरुजीना जातीयवादी म्हणताना
या बयेने अक्कल गहाण ठेवली होती की नशापाणी करून पोटातली गरळ बाहेर ओकत होती ?
शिवाजी महाराजांच्या राज्याभीषेकाचा संदर्भ देताना ही बया तिथे ब्राम्हणांनी काय आणि किती खाल्ले याचा आणि कुणी किती दान घेतले याचा हिशेब लावत बसली आहे. अग बये राज्याभिषेका सारखा मोठा सोहळा म्हटल्यावर दानधर्म अन्नदान इत्यादी आलेच, त्या काळातील त्या काही परंपरा होत्या
त्याच्या खर्चाचा हिशोब मांडताना तू ' स्वराज्य उभे करण्या साठी झाला नाही एवढा खर्च अन्नदान आणि दक्षिणेत दानधर्मात झाला " असे म्हटलेस यात ब्राम्हणाच्या बुभुक्षित भिक्षुकी वृतीचा निर्देश करताना तूशिवाजीमहाराजांनादेखील भोगविलासी राजांच्या पंक्तीला नेवून बसवलेस
 हे तुझ्या ब्राम्हण द्वेषाने भडकलेल्या मेंदूत आलेही नसेल . जो काही दानधर्म झाला तो स्वतः छत्रपतींच्या मर्जीने व उपस्थितीत स्वहस्ते झाला . तू म्हणतेस तशी  त्यावेळी स्वराज्याची संप्पती भट- भिक्षुकांवर
आकारण उधळली गेली असेल तर त्या साठी स्वतः छत्रपती देखील तेवढेच जबाबदार आहेत . नशीब तू त्यावेळी जल्माला आलेली नव्हतीस नाहीतर माहितीच्या अधिकाराचा ( दूर ) उपयोग करून तू ब्राम्हनाबरोबरच महाराजानाही अडचणीत आणून ( तुझ्या संघटनेच्या कार्या( ?) साठी वर्गणी किंवा देणगी ( खरे तर खंडणी ) मागितली असतीस इतकेच नव्हेतर आगरा दौरा , सुरतेची लुट , गड किल्यांची बांधकामे , शस्र खरेदी व  निर्मिती , लग्न-कार्ये , युद्ध ,तह, मोहिमा या सगळ्या घटना मधे
ब्राम्हनासाठी किती निष्कारण खर्च झाला याची ही आपण माहिती मागवली असती ....ते जाऊद्या
ते ५०,००० ब्राम्हण  तो महान सोहळा पाहण्या साठी खाण्याच्या आमिषाने व दक्षिणेच्या मिषाने निदान तेथे गेले तरी ....आपले महान पूर्वज ( वयक्तिक आपले बरेका पाटलीण बाई ) त्या वेळी कुठे काय करत होते याची आपल्या कडे नोंद आहे का ? आणि स्वराज्याचे नुकसान ऐतखाऊ पोटभरू भट भिक्शुका पेक्षा फितूर मराठ्यांनी अधिक केले ( उदा. बांदल देशमुख , चंद्रराव मोरे , खंडोजी खोपडे , बजाजी निबालकर , गणोजी शिर्के , सूर्याजी पिसाळ , किती तरी मोठी यादी आहे ज्यांनी स्वराज्याचे स्वप्नं उधळून लावण्यासाठी व उधवस्त करण्या साठी कायम प्रयत्न केले . संभाजी महाराजांची  बदनामी करणाऱ्या ब्राम्हण कलम बहाद्दरापेक्षा संभाजी महाराजांना त्यांच्या कुटुंब कबिल्या सह ( त्यात शिवाजी महाराजांच्या एक पत्नीही होत्या ) औरन्जेबा च्या तावडीत देणारा गणोजी शिर्के व बाजी घोरपडे हा आपल्या रोषाचा धनी व्हायला हवा . पण आपल्या श्री मुखातून त्याबद्दल एकही अपशब्द बाहेर पडताना दिसत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते  

Monday 17 October 2011

anita patil hajir ho

अनिता पाटील हाजीर हो

अनिता पाटील हे नाव धारण करून आपण बहुजनांच्या ( विशेषतः मराठा ) नवतरुण पिढीची
दिशाभूल करून त्यांना बहकवत आहात. आपणाला खरोखरच मराठा/ बहुजन / स्पष्टच बोलायचेतर
ब्राम्हणेतर तरुण पिढीचे प्रबोधन करायचे असेल तर  कृपया ही ' कळवळ्याची प्रीती " नव्या युगाला समोर ठेऊन दाखवा . केवळ ब्राम्हणांना आणि त्यांच्या कावेबाज कारस्थानांना नव्या पिढी समोर ठेवून काय साध्य होणार ?  भले त्यांनी पुरातन कला पासून इतिहासा पर्यंत धर्म जाती - परंपरा आणि आमच्या अज्ञानाचा फायदा घेवून पोटे भरली असतील   किवा आजही तुम्ही म्हणता तसा त्यांचा पोटभरू बामणी कावाचालूअसेलही, पण  तो हाणून पाडण्यासाठी  पुराणआणि इतिहासाचे दाखले देवून आणि त्यांना शिव्या देवून आमची प्रगती कशी होणार ? 
दलितांनी हीच चूक केली आणि त्यांच्या बाबतीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नाची कशी धूळधाण झाली हे आपण पाहतच आहोत. आज दलित समाज एकसंध राहिलेला नाही , शहारा - शहारातइदिरानगर ,संजयगांधीनगर, राजीवगांधी नगर , आन्नाभावू साठेनगर , रमानगर, भीमनगर या नावाने नवे महारवाडे -मांगवाडे निर्माण झाले , गावातले डफडे, गावकी सुटली तरीही आजचा दलित तरुण नगरसेवाकांपासून आमदार -खासदार आणि मंत्र्यांच्या  दाराबाहेर बसून ओंजळीनेच पाणी पीत आहे .वर्गणी , मतविक्री, सभांची गर्दी या  रुपात तराळकी चालूच आहे .
मराठा तरुण ही याच मार्गाने जावा असे आपणास वाटत नाही या बाबतीत मला खात्री आहे .
म्हणूनच आपण जातीय विद्वेष निर्माण करण्या पेक्षा या तरुणांना शिक्षण , उद्योग , व्यवसाय किवा क्षमता असेल तर प्रसंगी राजकारणातही उतरायला सांगा . ब्राम्हण नेहमीच उगवत्या सूर्याला प्रणाम करत आलेले आहेत .
शिव्या देणे हा त्यांना नमविण्याचा मार्ग नाही . मराठ्यांनी सत्ता संप्पती आणि अधिकार प्राप्त करावेत . मग पहा ब्राम्हण कसे पुन्हा आपल्या पोथ्या पुराने लिहून आपल्याला देव बनवतात   

anita patil ek aadhunik masanjogi

अनिता पाटील : एक आधुनिक मसणजोगी !

सध्या मराठी ब्लॉग विश्वात अनिता पाटील नावाची कुणीतरी  स्वतःला बहुजनवादी विचारवंत
समजणारी थोर विदुषी आपल्या तद्दन उथळ चिंतनानी अक्षरश: वेचारिक दहशत माजवीत आहे.
मुळात अनिता पाटील ( ? ) स्त्री आहे की पुरुष ? की आणखी वेगळे काही ? या बाबत शाशंकता आहे .
स्वतःला फुले- शाहू - आंबेडकर यांच्या पुरोगामी व परिवर्तनवादी विचाराचा वारसदार
आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देवत मानणारी/रा हा/ही संत परंपरेतील
फक्त तुकारामानच मानते./तो. ( बाकी सर्व संत ब्राम्हण म्हणून रद्दबातल ) ( विचारवंत ,लेखक ,स्वातंत्र्य सेनिक यासर्वांच्याबाबतीतहीया बाई /बाप्या चा हाच न्याय आहे ) एवढेच कशाला ( अगदी शिवाजी महाराजांच्या मावळ्यातही  ही /हा बाजारबुणगा ( की बाजारबसवी ) याच  जातीय  गटारीतून चिखलफेक करीत आहे .

Tuesday 11 October 2011

anna ki topi

लोकाना टोप्या घालणारेस्वतः टोप्या घालू लागले प्रत्येक वाल्याला वाल्मीकि होण्याचे स्वप्न आता पडू लागले   अन्ना सोल्ड क्याप नवी गोष्ट तयार झाली कुणालाच माहित नाहीकाय दडलय टोपी खाली  आम्हा भारतियाना नेहमीच ऐक पुंगीवाला लागतो गर्दी मधे मग  आम्ही सर्वांना रेटून पुढे असतो  रामलीला मैदानावर रामायण घडेल की महाभारतकी उपोषानाची हौस भागवून भरत येईल परत  लोकपाल येईल न येईल ऐक मात्र नक्की होइल आरत्या भजने फोटो पुतळयात नवा गाँधी आवतार घेइल  भारतीय मानसिकतेची हीच खरी गम्मत आहे महात्म्याना देव बनवण्याची परंपरा कायम आहे  राम , कृष्ण , बुद्ध ,महावीर गाँधी आसोकी आम्बेडकर सगळ्याना आम्ही बनवले देव त्यांच्या नावावर चालू आहे बिनधास्त देव-घेव  अन्नांचे काय होणार ?मी कशाला सांगायला हवे उपोषनाचा उस्तव झाल्यावर आणखी काय घडणार नवे ?

anna te mahatma

अण्णा ते महात्मा
खरे म्हणजे कुणीही कुणाला महात्मा म्हणायला कुणाची कुणाला
हरकत असण्याचे काही कारण नाही .
त्यातलेत्यात हे संबोधन अण्णा हजारे या महामानवाला  त्यांचे महागाव - राळेगणसिध्धीतील
महानागरिक , महाग्रामसभेचा -महाठराव  घेवून अण्णा बद्दलचा महादर व्यक्त करीत असतील तर कुणाला त्या बद्दल महापोटशूळ उठण्याचे काही कारण नाही .

मुळात गाव पातळीवर कुणाबद्दल काय उपाध्या लावाव्यात याला काही बंधन नाही
एखाद्या कधीकाळी तडीपार झालेल्या, दारूचे आड्डे चालवणाऱ्या , अनेक आणि केवळ काळेच
धंदे करणाऱ्या , खून- बलात्कार-खंडणी -अपहरण या सारख्या कर्तुत्वाची पार्श्वभूमी असणार्या
पण ( लोकशाहीतील लोकप्रियतेचा फंडा वापरून ) साधा नगरसेवक बनलेल्या गुंडाचा देखील
नागरी सत्कार होऊ शकतो...त्याला मानपत्र दिले जाते ....गावभर मोठमोठे होर्डीगन्स लावून
त्याचा उल्लेख महानायक . लोकमान्य ,ऐपेरीक्षाचालकांचा  हृदयसम्राट , असाही केला जातो ........
त्या तुलनेत अण्णांना त्यांच्या गावकर्यांनी महात्मा म्हणायचे ठरवले तर काय बिघडले ?
कुणीतरी असेही म्हणाले कि अण्णांना महात्मा म्हटल्या   मुळे महात्मा या उपाधीचे अवमूल्यन वेगेरे होईल ......असे काही असेल तर भारत सरकार ने तातडीने गांधीजींच्या नावाला जोडून महात्मा या शब्दाचे पेटंट घ्यायला हवे ...हो , नंतर उगाच वांधे नको ,
या वरून लहान असताना वाचलेल्या निळ्या कोल्याची  गोष्ट आठवली.  अण्णा जर कोल्हा असतील तर कधीना कधी कोल्हेकुई करतीलच ...तेव्हा त्यांचे रंगवलेले महात्मा पण उघडे पडेल
किवा असेही होईल कि हे लादलेले महात्मा पण अण्णा निभावून हि नेतील ...आणि कदाचित आधीच्या महात्म्यांपेक्षा मोठे योगदान त्यांचे हातून घडेल, आणि असे घडू नये असे कोण म्हणेल ?
आणि जरी असे म्हटले किवा कुणी अगदी ठरवून असे होऊ नये या साठी प्रयत्न केले तरी कुणाचे महात्मा बनणे कुणी रोखू शकत  नसते ..... प्राचीन काळापासून आधुनिक जगाच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर कुणालाही हे पटेल ......मग अण्णाना महात्मा बनण्याची संधी नाकारणारे तुम्ही आम्ही कोण ?  जर अण्णा त्या लायकीचे नसतील तर काळाच्या कसोटीवर टिकणार नाहीत ......आणि असतील तर काळाला पुरून उरतील .......

Monday 10 October 2011

namskar ramram -

नमस्कार....राम राम .....

आज आपली ही पहिलीच भेट असल्याने

अधिक बोलणे टाळून नमस्कार ...राम राम करून

थांबूया ....पुन्हा भेटू लवकरच