लोकाना टोप्या घालणारेस्वतः टोप्या घालू लागले प्रत्येक वाल्याला वाल्मीकि होण्याचे स्वप्न आता पडू लागले अन्ना सोल्ड क्याप नवी गोष्ट तयार झाली कुणालाच माहित नाहीकाय दडलय टोपी खाली आम्हा भारतियाना नेहमीच ऐक पुंगीवाला लागतो गर्दी मधे मग आम्ही सर्वांना रेटून पुढे असतो रामलीला मैदानावर रामायण घडेल की महाभारतकी उपोषानाची हौस भागवून भरत येईल परत लोकपाल येईल न येईल ऐक मात्र नक्की होइल आरत्या भजने फोटो पुतळयात नवा गाँधी आवतार घेइल भारतीय मानसिकतेची हीच खरी गम्मत आहे महात्म्याना देव बनवण्याची परंपरा कायम आहे राम , कृष्ण , बुद्ध ,महावीर गाँधी आसोकी आम्बेडकर सगळ्याना आम्ही बनवले देव त्यांच्या नावावर चालू आहे बिनधास्त देव-घेव अन्नांचे काय होणार ?मी कशाला सांगायला हवे उपोषनाचा उस्तव झाल्यावर आणखी काय घडणार नवे ?
No comments:
Post a Comment