या पाटलीणबाईला आवरा
अरे कुणी तरी या बोलभांड अनिता पाटलीण बाईला आवरा,...............
इतिहासातून नकोते संदर्भ उचलून त्यातून हवेतसे अर्थ काढून ही कजाग बाई काय सिद्ध आणि त्यातून काय साध्य करू इच्छितेय हेच मला कळत नाही . साने गुरुजीना जातीयवादी म्हणताना
या बयेने अक्कल गहाण ठेवली होती की नशापाणी करून पोटातली गरळ बाहेर ओकत होती ?
शिवाजी महाराजांच्या राज्याभीषेकाचा संदर्भ देताना ही बया तिथे ब्राम्हणांनी काय आणि किती खाल्ले याचा आणि कुणी किती दान घेतले याचा हिशेब लावत बसली आहे. अग बये राज्याभिषेका सारखा मोठा सोहळा म्हटल्यावर दानधर्म अन्नदान इत्यादी आलेच, त्या काळातील त्या काही परंपरा होत्या
त्याच्या खर्चाचा हिशोब मांडताना तू ' स्वराज्य उभे करण्या साठी झाला नाही एवढा खर्च अन्नदान आणि दक्षिणेत दानधर्मात झाला " असे म्हटलेस यात ब्राम्हणाच्या बुभुक्षित भिक्षुकी वृतीचा निर्देश करताना तूशिवाजीमहाराजांनादेखील भोगविलासी राजांच्या पंक्तीला नेवून बसवलेस
हे तुझ्या ब्राम्हण द्वेषाने भडकलेल्या मेंदूत आलेही नसेल . जो काही दानधर्म झाला तो स्वतः छत्रपतींच्या मर्जीने व उपस्थितीत स्वहस्ते झाला . तू म्हणतेस तशी त्यावेळी स्वराज्याची संप्पती भट- भिक्षुकांवर
आकारण उधळली गेली असेल तर त्या साठी स्वतः छत्रपती देखील तेवढेच जबाबदार आहेत . नशीब तू त्यावेळी जल्माला आलेली नव्हतीस नाहीतर माहितीच्या अधिकाराचा ( दूर ) उपयोग करून तू ब्राम्हनाबरोबरच महाराजानाही अडचणीत आणून ( तुझ्या संघटनेच्या कार्या( ?) साठी वर्गणी किंवा देणगी ( खरे तर खंडणी ) मागितली असतीस इतकेच नव्हेतर आगरा दौरा , सुरतेची लुट , गड किल्यांची बांधकामे , शस्र खरेदी व निर्मिती , लग्न-कार्ये , युद्ध ,तह, मोहिमा या सगळ्या घटना मधे
ब्राम्हनासाठी किती निष्कारण खर्च झाला याची ही आपण माहिती मागवली असती ....ते जाऊद्या
ते ५०,००० ब्राम्हण तो महान सोहळा पाहण्या साठी खाण्याच्या आमिषाने व दक्षिणेच्या मिषाने निदान तेथे गेले तरी ....आपले महान पूर्वज ( वयक्तिक आपले बरेका पाटलीण बाई ) त्या वेळी कुठे काय करत होते याची आपल्या कडे नोंद आहे का ? आणि स्वराज्याचे नुकसान ऐतखाऊ पोटभरू भट भिक्शुका पेक्षा फितूर मराठ्यांनी अधिक केले ( उदा. बांदल देशमुख , चंद्रराव मोरे , खंडोजी खोपडे , बजाजी निबालकर , गणोजी शिर्के , सूर्याजी पिसाळ , किती तरी मोठी यादी आहे ज्यांनी स्वराज्याचे स्वप्नं उधळून लावण्यासाठी व उधवस्त करण्या साठी कायम प्रयत्न केले . संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या ब्राम्हण कलम बहाद्दरापेक्षा संभाजी महाराजांना त्यांच्या कुटुंब कबिल्या सह ( त्यात शिवाजी महाराजांच्या एक पत्नीही होत्या ) औरन्जेबा च्या तावडीत देणारा गणोजी शिर्के व बाजी घोरपडे हा आपल्या रोषाचा धनी व्हायला हवा . पण आपल्या श्री मुखातून त्याबद्दल एकही अपशब्द बाहेर पडताना दिसत नाही याचे आम्हाला आश्चर्य वाटते
बांदल फितूर होते याचा पुरावा दे
ReplyDeleteनव्हते याचा पुरावा मी देतो