Saturday 10 March 2012

प्रिय कोहम, स न वि वि
......तुझा अनिता पाटील किंवा छावा, संभाजी ब्रिगेड
वैगैरे संघटनावर काय वैयक्तिक राग असेल तो वैयक्तिक पातळीवर
काढ.  सरसगट मराठा समाज आणि जातीवर चिखलफेक नको !
वाईट आणि भ्रष्ट वृत्ती - प्रवृत्ती   एकाच जातीत असते; असे म्हणणे किंवा
स्वार्थ, अनैतिकता फंद- फितुरी हा कुणा एका जातीचा गुणधर्म आहे
असे म्हणणे प्रतिवाद म्हणून चालणारे असले तरी सत्याच्या कसोटीवर
टिकणारे नाही. उणी दुणी आणि उदाहरणेच द्यायची असल्यास तू जसा  
मराठा समाजाच्या  नखातला राई एवढा मळ काढून ते पर्वता एवढे
पातक असल्याचा कांगावा करतो आहेस तसा मला ही ( म्हणजे कुणालाही )
ब्राम्हण बद्दल देखील करता येयील. उलट हजारो वर्षापासून धर्मसत्ता एकहाती
ताब्यात असल्याने आणि राजसत्तेत देखील  ( रामायण -महाभारत काळापासून मोर्य,गुप्त ,
शक-शालिवाहन,यादव, मोगल, मराठे, राजपूत, डच, हून , पोर्तुगीज,इंग्रज आणि आता
लोकशाहीत सुध्धा ) कायम प्रशासन आणि सल्लागार म्हणून ब्राम्हनांचेच वर्चस्व असल्याने
ब्राम्हणांच्या अनैतिक अचरनांची लाखो उदाहरणे पुराव्या सह सांगता येतील.
( पेशवे किंवा शिवसेनेच्या सत्ता काळात राजसत्ताही आली तो अपवाद/ खरे तर ब्राम्हणांना
त्यात रस नाहीच. ' फळे चाखायची सोडून मळे कोन राखील ? )
शिवाय कोणत्याही धर्म/जाती /समाज समूहाला दीर्घकालीन दिशा दर्शक ठरणारे
लिखत साहित्य हा प्रांत देखील पुरातन काळा पासून आजतागायत बहुसंख्येने ब्राम्हनांच्याच
वर्चस्वाखाली आहे; त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला नाही असे तू छातीठोक पणे
म्हणू शकतोस काय ?
थोडक्यात एक अनिता तुझ्या  पूर्वजांच्या  हजारो पिढ्यांनी रचलेल्या बुलंद बुरुजाला धडाका
घेत असेल तर तो तिचा वेडेपणा आहे खास. त्यात तिचाच कपाळ मोक्ष आहे, हें ही निर्विवाद !
( जिथे ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ , शिवाजी , गांधी,  विनोबा , फुले शाहू ,आंबेडकर ,
कर्वे - आगरकर टवका ढिला करू शकले नाही  तिथे अनिता च्या टकराणी काय होणार ? )
असो; मला वाटते तू अनिताला किमान बोलू लिहू द्यायला हवे;
आणि मराठा समाजाला दुषणे देण्या पेक्षा आपल्या समाजाच्या दिव्या ( बुडा )  खाली किती
अंधार आहे याचे आत्मपरीक्षण करावे. ( एक झलक ; सिनेमातील अंगप्रदर्शन या बद्दल
बॉम्ब मारणारे संस्कृती रक्षक कोन ? तर ब्राम्हण आणि अंग प्रदर्शन करणाऱ्या हिरोइन्स
कोन ? तर ( उर्मिला मातोंडकर / ममता कुलकर्णी /वर्षा उसगावकर /माधुरी दीक्षित / मधु सप्रे ई ई ई )
ब्राम्हनच ! तेंव्हा मोहक .....कशाला एकमेकाचा वास घेताय ?
तलवारी उपासल्याकी सर्वांचेच रक्त सांडते......शत्रूचेही आणि आपले सुध्धा !  नाही का ?