Monday 17 October 2011

anita patil hajir ho

अनिता पाटील हाजीर हो

अनिता पाटील हे नाव धारण करून आपण बहुजनांच्या ( विशेषतः मराठा ) नवतरुण पिढीची
दिशाभूल करून त्यांना बहकवत आहात. आपणाला खरोखरच मराठा/ बहुजन / स्पष्टच बोलायचेतर
ब्राम्हणेतर तरुण पिढीचे प्रबोधन करायचे असेल तर  कृपया ही ' कळवळ्याची प्रीती " नव्या युगाला समोर ठेऊन दाखवा . केवळ ब्राम्हणांना आणि त्यांच्या कावेबाज कारस्थानांना नव्या पिढी समोर ठेवून काय साध्य होणार ?  भले त्यांनी पुरातन कला पासून इतिहासा पर्यंत धर्म जाती - परंपरा आणि आमच्या अज्ञानाचा फायदा घेवून पोटे भरली असतील   किवा आजही तुम्ही म्हणता तसा त्यांचा पोटभरू बामणी कावाचालूअसेलही, पण  तो हाणून पाडण्यासाठी  पुराणआणि इतिहासाचे दाखले देवून आणि त्यांना शिव्या देवून आमची प्रगती कशी होणार ? 
दलितांनी हीच चूक केली आणि त्यांच्या बाबतीत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या स्वप्नाची कशी धूळधाण झाली हे आपण पाहतच आहोत. आज दलित समाज एकसंध राहिलेला नाही , शहारा - शहारातइदिरानगर ,संजयगांधीनगर, राजीवगांधी नगर , आन्नाभावू साठेनगर , रमानगर, भीमनगर या नावाने नवे महारवाडे -मांगवाडे निर्माण झाले , गावातले डफडे, गावकी सुटली तरीही आजचा दलित तरुण नगरसेवाकांपासून आमदार -खासदार आणि मंत्र्यांच्या  दाराबाहेर बसून ओंजळीनेच पाणी पीत आहे .वर्गणी , मतविक्री, सभांची गर्दी या  रुपात तराळकी चालूच आहे .
मराठा तरुण ही याच मार्गाने जावा असे आपणास वाटत नाही या बाबतीत मला खात्री आहे .
म्हणूनच आपण जातीय विद्वेष निर्माण करण्या पेक्षा या तरुणांना शिक्षण , उद्योग , व्यवसाय किवा क्षमता असेल तर प्रसंगी राजकारणातही उतरायला सांगा . ब्राम्हण नेहमीच उगवत्या सूर्याला प्रणाम करत आलेले आहेत .
शिव्या देणे हा त्यांना नमविण्याचा मार्ग नाही . मराठ्यांनी सत्ता संप्पती आणि अधिकार प्राप्त करावेत . मग पहा ब्राम्हण कसे पुन्हा आपल्या पोथ्या पुराने लिहून आपल्याला देव बनवतात   

No comments:

Post a Comment