Tuesday 8 November 2011

tukoba aani shivba

तुकोबा आणि शिवबा


मला संत तुकाराम महाराजां बद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल नितांत आदर आहे. आपले भाग्य म्हणून तुकाबांच्या रुपात एक देवमाणूस आणि शिवबांच्या रुपात देवदुर्लभ महापुरुष महाराष्ट्राला लाभला. त्यांच्या मुळेच महाराष्ट्राच्या मातीत सुजन्य आणि वीरता रुजली. ( त्यांनी रुजवलेल्या या बीजामुळेच तेंव्हा आणि आजही आपण बामणी कावा/ काही मराठ्यांची फंद- फितुरी आणि मोगली-इग्रजी - काँग्रेसी - शिवशाही ( बाळशाही ) , शारद्शाही इत्यादी आक्रमणातही टिकून आहोत )

पण मला इथे एका वेगळ्याच मुद्दया कडे आपले लक्ष वेधायचे आहे
तुकोबा आणि शिवबा एकाच कालखंडातील आहेत हे आपणास माहितीच आहे .
काहींच्या मते शिवबा तुकोबांना भेटले देखील होते . शिवबांनी तुकोबांना नजराणा पाठवला होता अशीही एक दंत कथा इतिहास म्हणून सांगितली जाते .
असे जर असेल तर मग
१) ज्यावेळी देहूतील ब्राम्हणांनी तुकोबांना त्यांची गाथा डोहात बुडवायला सांगितली
   त्यावेळी त्या परिसराचे सरदार ( जवळपास राजेच ) असणाऱ्या शिवबांनी ही घटना का   
होऊ दिली ( गाथा बुडवण्याची घटना अचानक नाही तर धर्म  पीठ बोलावून, तुक्या वेदिक धर्म विरोधी विचार मांडीत असल्याचे आरोप ठेवून , तुकारामांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्याचे नाटक वठवून  समारंभ पूर्वक करण्यात आली होती . गाथेचे बाड खुद्द तुकाराम महाराजांच्या डोक्यावर देवून मागे त्यांचे सर्व टाळकरी / वारकरी चालवत नेवून संत विचाराची धिंड आणि नंतर खून ( पाण्यात बुडवून ) करण्यात आला . ही सर्व प्रक्रिया चार दिवस चालली . तरीही तेथून चार कोसावर असणाऱ्या शिवबांनी हे का रोखले नाही ?

No comments:

Post a Comment