Monday 5 December 2011

yala mazi harkat nahi

याला माझी हरकत नाही

प्रिय अनिता,
तू वेद ,वेदांगे ,उपनिषदे ,पुराणे, रामायण - महाभारत या सारखी महाकाव्ये
यात येणाऱ्या कथानकांचा तात्कालिक समाजव्यवस्थेचे प्रतिक म्हणून आभ्यास
करतेस की एतेहासिक सत्य म्हणून ? की केवळ कवी कल्पना म्हणून ?
हे आधी एकदा नीटपने विचारपूर्वक ठरव.
हे हि लक्षात ठेव की हे साहित्य अपोरषीय म्हणजेच कुणा एकाने लिहिलेले नसून
मोखिक म्हणजेच एकापीढी कडून दुसऱ्या पिढीकडे कथा , गोष्टी , गाणी , लोकगीते , 
लोककला , प्रवचने , स्त्रीगीते , कीर्तने , जानपदगीते , जात्यावरच्या  ओव्या , या सारख्या अनेक
माध्यामातून प्रवाहित झालेले आहे . प्रवाहित होताना त्यात स्थळ काळ व्यक्ती समाज
अशा अनेक संधर्भांची भर पडत गेलेली आहे . त्या साठी कुणा एका व्यक्ती वा समाजाला
दोष देता येणार नाही , कृष्ण या पत्र बद्दल तर बोलायलाच नको ; त्याच्यावर तर
तमासगीरानी सुध्धा हात फिरवला आहे ,
पण एकंदर तू हा विषय निवडलाच आहे तर तू या सर्व साहित्यावर चिकित्सा जरूर
कर . हरकत नाही , फक्त एकच पथ्य सांभाळ ; नेहमी प्रमाणे हरदासाची कथा मुळ पदावर
या न्यायाने पुन्हा कुणा एका जातीवर शरसंधान करण्या साठी आपला वेळ आणि बुद्धी
खर्ची घालू नकोस , तू पुन्हा त्या दिशेने जात आहेस हे ज्या क्षणी जाणवेल त्या क्षणी
हा दादाहरी तुला रोखण्या साठी तुझ्या समोर उभा ठाकलेला असेल .
तो पर्यंत तूर्तास सप्रेम नमस्कार , वडिलकीच्या नात्याने अधिकार वाणीने दोन शब्द
सुनावले ; त्या बद्दल वाईट वाटून घेवू नकोस , लेकराला मुस्कटात मारताना वळ लेकराच्या  
गालावर आणि पीळ बापाच्या पोटात पडत असतो हे लक्षात घे . जमल्यास सरोजा
नावाच्या एका आपल्याच मराठा मुलीने पाठवलेली प्रतिक्रिया मनापासून समजून उमजून
वाच ....मी सुध्धा ती प्रतिक्रिया वाचून तुझ्या बाबतीत वेगळा विचार करण्यास उदुक्त
झालो ,,,,पण याचा अर्थ असाही नाही की तू काहीही करावे आणि मी खपवून घ्यावे ,,,
याचेही भान असू द्यावे ....धन्यवाद !

No comments:

Post a Comment